Sunday, May 29, 2011

आज मला तुझी खूप आठवण येते......

आज मला तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते,
मनाला पक्के ठाऊक असते कि...
कि तू येणार नाहीस तरी पण...
तरी पण मन तुझी वाट पाहणे सोडतच नाही...


सर्वांमध्ये नसूनही मी सर्वांमध्ये असते,

पण सर्वजण
गेल्यावर मात्र मी कुठेच नसते,
मी कुठेच नसते..मी कुणाचीच नसते,
मी अगदी एकटी...अगदी एकटी असते....
आणि मग तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते...

संध्याकाळच्या गारव्याने अंगावर आलेला काटा
आठवतोय,
त्यावर झालेला तुझा स्पर्श आठवतोय,
गालावरचा तुझा उष्ण श्वासदेखील आठवतोय,
पण आता काहीच नाही.... ना काटा, ना स्पर्श, ना श्वास...
मग तुझा स्पर्श तुझा श्वास आठवतो,
आणि तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते...

अलगद पकडलेल्या हातातला आपलेपणा आठवतोय,

सहज म्हणून घेतलेल्या मिठीतला घट्टपणा आठवतोय,
तुझ्या मिठीतून पाहिलेला गुलमोहर आठवतोय,

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय,
क्षणन क्षण आठवतोय..कणन कण आठवतोय,
तो कणन कण मला जपायचाय,
तू नसताना त्याची सोबत घेऊन तू असल्याचा आनंद मिळवायचाय,
तू आत्ता नाहीस ह्या विचारानेच मी असह्य होते,
आणि मग तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते,
मनाला पक्के ठाऊक असते कि...
कि तू येणार नाहीस तरी पण...
तरी पण मन तुझी वाट पाहणे सोडतच नाही...

3 comments: